Skip to content
सं Samvidhan

The Constitution of India

अनुच्छेद 371A

नागालँड राज्याबाबत विशेष तरतूद

नागालँड राज्याबाबत विशेष तरतूद.—(1) या संविधानात काहीही असले तरी,— (क) (एक) नागांच्या धार्मिक किंवा सामाजिक प्रथा, (दोन) नागांचा रूढीप्राप्त कायदा व कार्यपद्धती, (तीन) नागांच्या रुढीप्राप्त कायद्यानुसार निर्णय देणे, हे ज्यांत अंतर्भूत आहे असे दिवाणी व फौजदारी न्यायदान, (चार) जमीन व तिच्यातील साधनसंपत्ती यांचे स्वामित्व व हस्तांतरण, यांबाबत संसदेचा कोणताही अधिनियम, नागालँडच्या विधानसभेने ठरावाद्वारे तसे ठरविल्याशिवाय नागालँड राज्याला लागू होणार नाही ; (ख) नागालँड राज्याच्या निर्मितीच्या लगतपूर्वी नागा हिल्स त्युएनसांग क्षेत्रात उद्भवणारी अंतर्गत अशांतता नागालँडच्या राज्यपालाच्या मते जोपर्यंत तेथे किंवा त्याच्या कोणत्याही भागात चालू आहेत तितका काळ, त्या राज्यातील कायदा व सुव्यवस्था यांबाबत त्याच्यावर विशेष जबाबदारी असेल आणि त्यासंबंधीची आपली कार्ये पार पाडताना करावयाच्या कारवाईबाबत राज्यपाल, मंत्रिपरिषदेचा विचार घेतल्यानंतर, आपल्या वैयक्तिक निर्णयशक्तीचा वापर करील : परंतु असे की, जर कोणतीही बाब ही, जिच्याबाबत या उप-खंडान्वये राज्यपालाने आपली वैयक्तिक निर्णयशक्ती वापरून कार्य करणे आवश्यक आहे अशी बाब आहे की नाही, असा प्रश्न उद्भवला तर, राज्यपालाचा स्वविवेकानुसार निर्णय अंतिम असेल आणि त्याने केलेल्या कोणत्याही गोष्टीची विधीग्राह्यता ही, त्याने आपली वैयक्तिक निर्णयशक्ती वापरून कार्य करावयास हवे होते किंवा नको होते, या कारणावरून प्रश्नास्पद करता येणार नाही : परंतु आणखी असे की, जर नागालँड राज्यातील कायदा व सुव्यवस्था यांबाबत राज्यपालावर विशेष जबाबदारी असण्याची यापुढे आवश्यकता नाही यासंबंधी राष्ट्रपतीची, राज्यपालाकडून अहवाल मिळाल्यावरून किंवा अन्यथा खात्री झाली तर, तो, आदेशाद्वारे, राज्यपालावरची अशी जबाबदारी, आदेशात विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा दिनांकापासून संपुष्टात येईल, असा निदेश देऊ शकेल ; (ग) अनुदानाच्या कोणत्याही मागणीसंबंधी आपली शिफारस करताना, नागालँडचा राज्यपाल, कोणत्याही विशिष्ट सेवेसाठी किंवा प्रयोजनासाठी भारत सरकारने भारताच्या एकत्रित निधीतून पुरविलेल्या कोणत्याही पैशाचा समावेश त्या सेवेशी किंवा प्रयोजनाशी संबंधित असलेल्या अनुदानाच्या मागणीत असेल व अन्य कोणत्याही मागणीत असणार नाही, याची सुनिश्चिती करील ; (घ) नागालँडचा राज्यपाल जाहीर अधिसूचनेद्वारे याबाबतीत विनिर्दिष्ट करील अशा दिनांकापासून त्युएनसांग जिल्ह्याकरता पस्तीस सदस्यांची मिळून बनलेली एक प्रादेशिक परिषद स्थापन करण्यात येईल व राज्यपाल स्वविवेकानुसार पुढील गोष्टींकरता तरतूद करणारे नियम करील,— (एक) प्रादेशिक परिषदेची रचना व प्रादेशिक परिषदेचे सदस्य ज्या रीतीने निवडले जातील ती रीत : परंतु असे की, त्युएनसांग जिल्ह्याचा उप आयुक्त हा प्रादेशिक परिषदेचा पदसिद्ध अध्यक्ष असेल आणि प्रादेशिक परिषदेचा उपाध्यक्ष, तिचे सदस्य त्यांच्यामधून निवडून देतील ; (दोन) प्रादेशिक परिषदेचे सदस्य म्हणून निवडले जाण्यासाठी आणि राहण्यासाठी लागणाऱ्या अर्हता ; (तीन) प्रादेशिक परिषदेच्या सदस्यांचा पदावधी आणि त्यांना प्रदेय असलेले वेतन व भत्ते, कोणतेही असल्यास ; 166 (चार) प्रादेशिक परिषदेची कार्यपद्धती व तिचे कामकाज चालवणे ; (पाच) प्रादेशिक परिषदेच्या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणि त्यांच्या सेवाशर्ती ; आणि (सहा) प्रादेशिक परिषद घटित करण्यासाठी आणि तिचे कार्य योग्य प्रकारे चालण्यासाठी ज्या बाबतीत नियम करणे आवश्यक आहे, अशी अन्य कोणतीही बाब. (2) या संविधानात काहीही असले तरी, नागालँड राज्याच्या निर्मितीच्या दिनांकापासून दहा वर्षांच्या कालावधीपर्यंत किंवा राज्यपाल यासंबंधात प्रादेशिक परिषदेच्या शिफारशींवरून जाहीर अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्ट करील अशा आणखी कालावधीपर्यंत,— (क) त्युएनसांग जिल्ह्याचे प्रशासन राज्यपालाकडून चालवले जाईल ; (ख) सबंध नागालँड राज्याच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी भारत सरकारने नागालँडच्या शासनाला काही पैसा पुरवला असेल त्या बाबतीत, राज्यपाल, स्वविवेकानुसार त्या पैशाची त्युएनसांग जिल्हा व उर्वरित राज्य यांच्यामध्ये समन्याय्य वाटप करण्याची व्यवस्था करील ; (ग) नागालँड विधानमंडळाचा कोणताही अधिनियम, राज्यपालाने प्रादेशिक परिषदेच्या शिफारशीवरून जाहीर अधिसूचनेद्वारे तसा निदेश दिल्याशिवाय त्युएनसांग जिल्ह्यास लागू होणार नाही आणि अशा कोणत्याही अधिनियमाबाबत असा निदेश देताना राज्यपाल, तो अधिनियम त्युएनसांग जिल्ह्यास किंवा त्याच्या कोणत्याही भागास लागू होताना, प्रादेशिक परिषदेच्या शिफारशीवरून राज्यपाल विनिर्दिष्ट करील अशा अपवादांसह किंवा फेरबदलांसह प्रभावी होईल, असा निदेश देऊ शकेल : परंतु असे की, या उप-खंडान्वये दिलेला कोणताही निदेश, त्याचा भूतलक्षी प्रभाव असेल अशा प्रकारे देता येईल ; (घ) राज्यपालाला, त्युएनसांग जिल्ह्यात शांतता नांदावी, त्याची प्रगती व्हावी व त्याचे शासन सुविहित व्हावे यासाठी विनियम करता येतील आणि त्याप्रमाणे केलेल्या कोणत्याही विनियमांद्वारे त्या जिल्ह्यास त्या त्या वेळी जो लागू असेल अशा कोणत्याही संसदीय अधिनियमाचे किंवा अन्य कोणत्याही कायद्याचे, आवश्यक असल्यास भूतलक्षी प्रभावाने, निरसन करता येईल किंवा त्यात सुधारणा करता येईल ; (ङ) (एक) नागालँडच्या विधानसभेत त्युएनसांग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सदस्यांपैकी एक सदस्य, मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यावरून त्युएनसांगविषयक व्यवहार मंत्री म्हणून राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल आणि मुख्यमंत्री, आपला सल्ला देताना, पूर्वोक्त सदस्यांपैकी बहुसंख्याकांच्या शिफारशीनुसार कृती करील 1 ; (दोन) त्युएनसांगविषयक व्यवहार मंत्री त्युएनसांग जिल्ह्यासंबंधीच्या सर्व बाबींसंबंधी कार्यवाही करील व त्याबाबत त्याला राज्यपालाशी थेट संपर्क साधता येईल, पण त्याविषयी तो मुख्यमंत्र्यास माहिती देत राहील ; (च) या खंडाच्या पूर्वगामी तरतुदींमध्ये काहीही असले तरी, त्युएनसांग जिल्ह्यांसंबंधीच्या सर्व बाबींवर राज्यपाल स्वविवेकानुसार अंतिम निर्णय करील ; (छ) अनुच्छेद 54 व 55 आणि अनुच्छेद 80 चा खंड (4) यांमध्ये राज्याच्या विधानसभेच्या निवडून आलेल्या सदस्यांसंबंधीच्या किंवा अशा प्रत्येक सदस्यांसंबंधीच्या निर्देशांमध्ये, या अनुच्छेदाअन्वये स्थापन झालेल्या प्रादेशिक परिषदेने निवडून दिलेल्या नागालँडच्या विधानसभेच्या सदस्यासंबंधीचे किंवा सदस्यांसंबंधीचे निर्देश समाविष्ट असतील ; 167 (ज) अनुच्छेद 170 मध्ये,— (एक) खंड (1) हा, नागालँडच्या विधानसभेच्या संबंधात, त्यामध्ये "" साठ '' याऐवजी जणू काही ""शेहेचाळीस'' असा शब्दोल्लेख दाखल केलेला असावा त्याप्रमाणे प्रभावी होईल ; (दोन) उक्त खंडात, त्या राज्यातील क्षेत्रीय मतदारसंघातून होणाऱ्या प्रत्यक्ष निवडणुकीसंबंधीच्या निर्देशात, या अनुच्छेदान्वये स्थापन झालेल्या प्रादेशिक परिषदेच्या सदस्यांमार्फत होणारी निवडणूक समाविष्ट असेल ; (तीन) खंड (2) व (3) मध्ये, क्षेत्रीय मतदारसंघासंबंधीच्या निर्देशांचा अर्थ, कोहिमा व मोकोकचुंग जिल्ह्यांच्या क्षेत्रीय मतदारसंघासंबंधीचे निर्देश, असा असेल. (3) जर या अनुच्छेदातील पूर्वगामी तरतुदींपैकी कोणतीही तरतूद अंमलात आणताना कोणतीही अडचण उद्भवली तर, राष्ट्रपतीला, ती अडचण दूर करण्यासाठी स्वत:ला आवश्यक वाटेल अशी कोणतीही गोष्ट (अन्य कोणत्याही अनुच्छेदाचे कोणतेही अनुकूलन किंवा फेरबदल यांसह) आदेशाद्वारे, करता येईल : परंतु असे की, नागालँड राज्याच्या निर्मितीच्या दिनांकापासून तीन वर्षे संपल्यानंतर, असा कोणताही आदेश काढला जाणार नाही. स्पष्टीकरण.—या अनुच्छेदात कोहिमा, मोकोकचुंग व त्युएनसांग जिल्हे यांना नागालँड राज्य अधिनियम, 1962 मध्ये जे अर्थ असतील तेच अर्थ असतील.]

पडताळणी प्रलंबित

हे का आहे

नागालँड 1963 मध्ये आसाममधून स्वतंत्र राज्य म्हणून निर्माण झाले; त्यापूर्वी नागा राजकीय चळवळी आणि स्वायत्तता किंवा स्वातंत्र्याच्या मागण्यांसह सशस्त्र संघर्ष चालू होता. 1960 च्या 16‑सूत्री कराराने भारत सरकार व नागा नेतृत्वाने नागा परंपरा, जमीनहक्क आणि तुलनेने कमी विकसित, वेगळ्या प्रशासकीय स्थितीत असलेल्या तुएनसांग प्रदेशाचे टप्प्याटप्प्याने समाकलन यांचे आश्वासन दिले. त्या आश्वासनांना कायदेशीर हमी देण्यासाठी कलम 371A समाविष्ट करण्यात आले, ज्यामुळे नागांची ओळख, रूढीगत कायदा आणि जमीनस्वामित्व स्थानिक नियंत्रणाखाली राहिले; तसेच राज्यपालांना चालू अस्थिरतेच्या काळात कायदा‑सुव्यवस्था हाताळण्याचे वैविध्यपूर्ण (डिस्क्रिशनरी) अधिकार आणि तुएनसांगच्या स्वतंत्र संक्रमणकालीन प्रशासनावर देखरेख देण्यात आली.

न्यायालये याला कशी वाचतात

न्यायालयांनी सर्वसाधारणपणे कलम 371A ला नागा रूढीगत कायदा व जमीनहक्कांसाठी बलवान संरक्षक म्हणून मान्यता दिली आहे आणि विधानसभेची संमती नसताना साध्या केंद्रीय कायद्यांना त्यावर वर्चस्व देण्याबाबत अनुत्सुकता दाखवली आहे. सर्वोच्च न्यायालय व गौहाटी उच्च न्यायालयाने ‘जमिनीचे स्वामित्व व हस्तांतरण’ या व्याप्तीवरील वाद हाताळले असून, अनेकदा रूढी व आदिवासी संस्थांकडे आदराने पाहिले आहे. राज्यपालांच्या विवेकाधिकाराच्या अंतिमतेच्या तरतुदीकडे काही खटल्यांत संकुचित दृष्टीने पाहिले गेले आहे—न्यायालये राज्यपालांचे कृत्य घटनात्मक मर्यादांत होते का हे तपासतात; तथापि ‘समाधान’ या बाबतीतील सरळ न्यायालयीन पुनरावलोकन मर्यादितच आहे.

सामान्य गृहितके
  • धरण: कलम 371A मुळे नागालँड पूर्णपणे भारतीय संविधानाबाहेर जातो—हे चुकीचे आहे.

    घटना: नागालँड पूर्णपणे भारताचा भाग राहतो; फक्त काही विशिष्ट विषय—नागा परंपरा, जमीन आणि तुएनसांगचे संक्रमणकालीन प्रशासन—यांनाच विशेष संरक्षण किंवा व्यवस्था आहे.

  • धरण: या कलमान्वये राज्यपालांचे विवेकाधिकार कायमचे आहेत—हे अयोग्य आहे.

    घटना: कायदा‑सुव्यवस्थेबाबतची विशेष जबाबदारी तेव्हढ्याच काळासाठी टिकते, जेव्हा राज्यपालांना अस्थिरता असल्याचे वाटते; आणि राष्ट्रपती आदेशाने ती समाप्त करू शकतात. तुएनसांगसाठीच्या विशेष व्यवस्था मुळात सुमारे दहा वर्षांसाठी होत्या, पुढे अधिसूचनेने वाढविता येण्याजोग्या.

  • धरण: संसदेचा कोणताही कायदा कधीच नागालँडला लागू होऊ शकत नाही—हे चुकीचे आहे.

    घटना: फक्त चार नमूद विषयांवरील (धार्मिक/सामाजिक प्रथा, रूढीगत कायदा, त्यासंबंधी न्यायव्यवस्थेचे संचालन, आणि जमिनीचे स्वामित्व/हस्तांतरण) कायद्यांनाच विधानसभेचा ठराव आवश्यक असतो; इतर केंद्रीय कायदे नेहमीप्रमाणे लागू होतात.